ग्रामपंचायत माहिती
बोर्ली गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक गांव म्हणून महाराष्ट्रात ओळखल आहे . प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. बोर्ली हे गाव मुंबई -आग्रा महामार्ग पासून ७ कि.मी.अंतरावर वसलेले आहे या गावालगत भावली धरण असून सदर धरणाचे पाणी दारणा धरणा द्वारे छत्रपती संभाजी नगर व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येते असतो. बोर्ली हे गाव पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण आहे.